अभंग ४८
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥१॥
काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥
हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥
तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥३॥
अर्थ:- जो मनुष्य सोमवार, एकादशी करीत नाही तो अंती कोणत्या गठीला जाईल माहित नाही ।।1।।
अश्या कर्मकांडने आंधळ्या झालेल्या लोकांची तुकाराम महाराजाना काळजी वाटते ।।ध्रु।।
जे हरी-हरांमधे फरक करतात , त्यांची शेवटी गति कशी असेल ? ।।2।।
ज्यांची नारायनावर श्रधा, भक्ति नाही, ते अंति कोणत्या गठीला जातील, अशी चिंता तुकोबांना वाटते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा