अभंग३८
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
अर्थ :- बिज शुद्ध असले तर येणारे फल पण उत्तम निपजते ।।1।।
ज्याच्या मुखी हरिणामामृत असते, त्या मधुर वानीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो ।।ध्रु।।
जो देह-चित्त-बुद्धिने निर्मळ आहे, त्याचे चित्त गंगाजलाप्रमाने पवित्र असते।।2।।
तुकोबा म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणी जीव विसावा घेउ शकतो।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा