हाल अभंग
गाथा अभंग १८२
बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं ॥१॥
नाहीं विटों देत भात । जेऊं बेसवी सांगातें ॥ध्रु.॥
बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥२॥
तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥३॥
अर्थ :- आम्ही अनेक दिवसांपासून देवाबरोबर गुर राखतो आहेत ।।1।।
कधी न नासनारे, न विटणारे भातुके देत. आम्ही त्याच्याबरोबर जेवतो ।।ध्रु।।
खुप दिवसांपासन आमचे कांबळे तो पांघरत आहे ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व काही आहे हे त्याचेच आहे. आमचे काहीही नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा