शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२६३ते माझे सोयरे सज्जन सांगाती

गाथा अभंग २६३

ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥

येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥

सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥

तुका म्हणे जैसे मानती हरिदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥

अर्थ :- जे विठ्ठल चरणांची सतत सेवा करतात ते माझे सोयरे, सोबती नातेवाइक आहेत ।।1।।

विश्वातील सर्व चारा चरांना मि वंदन करतो; कारण त्यांच्या मध्ये विठ्ठलाचा अंश आहे ।।ध्रु।।

जे-जे वैष्णव आहेत फयांचा मी जीवाभावाने दास झालो आहे, त्यांच्या  उच्छिष्टाची अपेक्षा मी करतो ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, जे हरिचे दास आहे तेच माला आवडतात, इतरांची माला पर्वा नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा