गाथा अभंग २८८
मांडे पुर्या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥
बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥२॥
तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥३॥
अर्थ :- काही लोक मांडे, पुर्या यांच्या चविचे नुसते वर्णन करुण हात नाचावतात ।।1।।
अश्या लोकांचे वक्तव्य मीठ नसलेल्या भोजनाप्रमाणे बचव असते ।।ध्रु।।
अंगी किंचितहि शौर्य नसताना नुसत्या बढ़ाया मारून काय उपयोग ? ।।2।।
तुकोबा म्हणतात, नुसती बड़बड़ करणारी मानसे ढोंगी असतात, खोटरडी असतात ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा