काला अभंग
गाथा अभंग १९८
भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्न एकवटा ।
देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥१॥
कैसा आळ घेसी । नव्हे तें चि करविसी । घेई दुसरें तयेसी । वारी म्हणे नको ॥ध्रु.॥
आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां स्थिरू । कांहीं करिना हा ।
तोंचिं केलें एके ठायीं । आतां निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरिसि म्हणे माता ॥२॥
त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव जालें समाधान । उठोनियां बैसे ।
माते बरें जाणविलें । अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥३॥
ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं ।
विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥
हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे देती आलिंगन । आनंद भोजनीं ।
तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥
अर्थ :- एके दिवशि ताटात वाढलेली सर्व अन्नपदार्थ कृष्णने एकत्र कालविले आणी नतर हट्ट धरून म्हणाला, आई, हे एकत्र केलेले अन्नपदार्थ निवडून पूर्वी होते तसे दे; नाहीतर मी जेवनार नाही. असे म्हणून तो जमिनीवर लोळण घेऊ लागला ।।1।।
यशोदामाता म्हणाली, कृष्णा, तू भलताच हट्ट करो आहेस. जे अशक्य आहे तेच करायला लावतो आहेस. अरे, वेगवेगळ्या पदार्थांचा काला केल्यानंतर ते पुन्हा पूर्वीसारखे कसे काय करता येईल ? ।।ध्रु।।
यशोदा म्हणाली, आता काय करावे ? त्याला मारू नये, याची संजुत घालावि. म्हणून समजूत घालत ती म्हणाली, "आपल्याच हटाने सर्व अन्नपदार्थ कालाविलेस, आता तूच ते निवडून खा. आम्हाला का बारे त्रास देतो आहेस ?" ।।2।।
ते ऐकून तो भानावर आला. समाधानाने उठून बसत तो आइला म्हणाला. तू यातून अंग काढून घेत जे बोललिस यात गैर काही नाही. माझी संजुत घाटलिस, ते बारे झाले ।।3।।
पदराने ताट झाकले. पूर्वीसारखे सर्व पदार्थ निरनीराळे केले. तो प्रकार पाहुन आइला नवल वाटले. आनंदित होऊन ती मनात म्हणाली, अरे' तुझ्यासारखा या विश्वात कोणीच नाही ।।4।।
त्याची आई अतिशय आनंदी झाली. तिच्या मनात ते सुख मावेना. तिने त्याला मिठीत घेऊन आलिंगन दिले. आनंदाने भोजन झाले. तिची ईच्या पूर्ण झाली. तुकाराम महाआज म्हणतात, मला त्यातील उरलेला भाग कुणीतरी दया हो! ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा