गाथा अभंग १९५
पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे ।
टाळ टिपरी मांदळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥१॥
चला तें कवतुक भाई रे । पाहों डोळां कामीं गुंतलेति काई रे ।
भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसें सुख त्रिभुवनीं नाहीं रे ॥ध्रु.॥
आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे ।
साही अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥२॥
भक्ताचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उट्या रे ।
सत्व सुंदर कास घालूनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥३॥
हरि हर ब्रम्हा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे ।
विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥४॥
वाणितील थोरी वैकुंठिचीं परी । न पवे पंढरीची सरी रे ।
तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतों नरनारींस रे ॥५॥
क्षेपक अर्थ :- पंधारीच्या बाजारात वैष्णव एकत्र जमले व त्यांनी सुंदर खेळ मांडला. टाळ मृदुंग तिपर्या यांचा एकच नाद सुरु झाला. देवकिचा बाळ श्रीकृष्ण हा उपास्य दैवत झाला ।।1।।
बंधूंनो, चला, आपण तो सोहळा डोळ्यांनी पाहु. साऱ्या त्रिभुवनात असे सुख नाही ।।ध्रु।।
चार वेद, सहा शास्त्र, अठारा पुराणे यांचा एक धंदाच् घातला आहे. टाळाच्या गजरात ते फेर धरून नाचत आहेत ।।2।।
त्यांच्या अंगावर भक्तीचे अभूषणे, मुद्रा घातल्या आहेत. स्वर्गातील तेहतीस कोटि देवहि हा सोहळा पाहत आहेत ।।3।।
वैकुंठाचा सोहळा कितीही थोर असला तरी त्याला पंधारिचि सर नाही ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मी नरणारीना सांगतो, हां सोहळा पहा. आळस करू नाका ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा