गाथा अभंग २६७
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥
अर्थ :- कलियुगामध्ये विवाहास पात्र झालेल्या मुलीचा बाप मुलाकडिल लोक मुलीला पाहायला आले तर प्रथम धनासाठी सौदा करतात ।।1।।
त्यामुळे अधर्म वाढत आहे, पूण्य कमी आणि पाप वाढत आहे ।।ध्रु।।
ब्रह्मानांनी आपला आचारधर्म सोडून दिला असून ते चोरी, चहाडी करू लागले आहेत ।।2।।
कपाळी टिळा लावन्याचे, पंचांग पाहन्याचे सोडून वीजार, कातडि पटटे घालू लागले आहेत ।।3।।
सत्तास्तानि बसून सामान्य लोकांवर अन्याय करू लागले आहेत ।।4।।
स्वयंपाक घरात तेल, तूप, सबनाचा हिशेब करतात ।।5।।
हीन लोकांची चाकरी करुण राजे मार खात आहेत ।।6।।
राजे लोक प्रजेला पीड़ा देतात ।।7।।
वैश्य-शूद्रादि ह्लकया वृत्तिचे लोक अधर्माने वागतात ।।8।।
बाह्यात्कारि सज्जनाचे सोंग करून अंतःकरणात विषारी विचार असतात ।।9।।
तुकोबा म्हणतात, कलियुगात ही परिस्तिति पाहुन हे विठ्ठला, निद्रा सोड आणि त्वरित धावत ये ।।10।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा