गाथा अभंग २०४
भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥
बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी ते ॥ध्रु.॥
पसरूनि मुख विश्वरूप खाय जाळ । सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥३॥
अर्थ :- कान्होबा सवंगड़यांना म्हणाला, की तुम्ही भीउ नाका. आपल्यावर्चे हे आगिचे संकट विश्वात्मक शक्ति निवारवल. घाबरुं जाऊ नाको. डोळे मिट स्वस्त रहा ।।1।।
बाप रे ! हां तर देवाचाहि देव आहे. काय करील आणि काय घडवून आनेल हे तर कोनालाच समाजु देणार नाही ।।ध्रु।।
त्याने विश्वरूप दाखवले आणि वनव्याचा अग्नी भक्षण करू कागला. बाकीचे सारे गोपाळ बोटांच्या फटीतून पाहत होते ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विनाकारं घाबरलो होतो. या कान्होबाच्या सहवसात असल्यावर कसलिहि भीति वाटत नाही, कसलाही शीन होत नाही. हे आज कळुन आले ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा