गाथा अभंग २८२
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥
ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥
तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥
अर्थ :- दुसर्याचा घात झालेला पाहुन ज्यांना आनंद होतो असे लोक पापी संजावे ।।1।।
शीघ्रकोपि मनुष्य अंती नरकाला जातात ।।ध्रु।।
ज्याला परनिंदा, वाइट बोलने ऐकायला, बोलायला आवडते, तोहि पापी आहे ।।2।।
तुकोबा म्हणतात, भंगखोर मनुष्यही असाच पापी असतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा