सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

२२९डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं

मृदंग पाट्या

गाथा अभंग २२९

डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥

खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥

मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्यायें ॥२॥

तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥३॥

अर्थ :- सोबत्यांना खेळात गुंतवून श्रीकृष्णने त्यांची इंद्रियरूपी गुरे पंचविष्याच्या आरण्यात पळवून नेली ।।1।।

त्या वेळी ते सारे संसाराचा खेळ खेळत होते. तो खेळ खेळतांना दोन्ही पक्षातील गोपाळांची भांडने विकोपाला गेली. भाडणे झाली. डोकी फुटली. या सर्व घटना श्रीकृष्ण दूर उभा राहून अलगत पने पाहत होता ।।ध्रु।।

या अपराधामुळे मायारूपी मातेने जीवघेणा दम दिला; तिला त्यांची जराहि दया आली नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, कंहोबा नेहमीच त्यांच्या माघे असतो, म्हणून हा प्रकार कळुन आला ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा