शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२४७सांपडला संदीं । मग बळिया पडे फंदीं

गाथा अभंग २४७

सांपडला संदीं । मग बळिया पडे फंदीं ॥१॥

ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥

दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥

तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥

अर्थ :- एखादा सामर्थ्यवान मनुष्य संकटात सापडला की पेचात अडकतो ।।1।।

त्या वेळी तो काळाच्या हाती सापडल्याने त्याचे काही चालत नाही ।।ध्रु।।

एखादी दानशूर व्यक्ती सुद्धा वेळ आल्यावर  भीक मागु लागते ।।2।।

तुकोबा म्हणतात, ही काळाची गति त्या नारायनाला काय सांगावे ? त्यानेच ती निर्माण केलि आहे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा