शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२५०काखे कडासन आड पडे

ब्रम्हचारी फिर्याद गेला - अभंग २

गाथा अभंग २५०

काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥

दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥

अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥

हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥

दोहीं ठायीं फजीत जालें । पारणें केलें अवकळा ॥४॥

तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥५॥

अर्थ :- एक करमठ ब्रम्हाच्यार्याच्या बगलेत हरणाचे कातड़े होते. वाटेत अदखळल्यामुळे ते खाली आडवे पडले अणि खड़बड़ खड़बड़ असा आवाज झाला ।।1।।

तो ब्रम्हचारी तुकाराम महाराजांना म्हणाला, अश्या फजितखोरांना मुळात लाज लज्याच् नाही. त्याची चांगली फजीती करा ।।ध्रु।।

मुख्य वर्म कुणीही आचरित नाही. वरवर रामनाम घेतात ।।2।।

तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात, त्याना नागवावे ।।3।।

दोन्ही ठिकाणी फजीती झाल्यामुळे त्याना अवकाळा प्राप्त झाली आहे ।।4।।

तुकोबा म्हणतात, या ब्रम्हचारी लोकांनी ब्रम्हचारी वेषाची वीटंबना केली आहे आणि स्वताच्या नाश करून घेतला आहे ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा