गाथा अभंग २०५
नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥१॥
चला रे याच्या पायां लागों आतां । राखिलें जळतां महा आगीपासूनि ॥ध्रु.॥
कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही कां रे करितां नवल । आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥३॥
अर्थ :- ज्याना हरिचे स्वरुप समाजले नव्हते त्यांना हरिन ते दाखविले. लाज न बालगता पुन्हा मुरली वाजवित तो नाचू लागला ।।1।।
सर्व सवंगदि म्हणाले. "चला रे. आपण कृष्णच्या पाया पडुया. त्याने आपल्याला आगीपासून वाचविले आहे ।।ध्रु।।
कृष्णा, एवढी मोठी आग तू कशी गिळूण टाकलीस? तुझ्या अंगाला, तोंडाला कुठे भाजले, पोळले दिसत नाही ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, एक गोपाळ म्हणाला, गड़यांनो, अरे तुम्ही सारे त्या कृष्णणाचे इतके नवल का करतात ? मला तर अजिबात नवल वाटत नाही. अरे. हा कृष्ण आपली शीदोरी खातो ना, म्हणून त्याच्या अंगी अग्नी भक्षण करण्या इतकी शक्ति आली आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा