गाथा अभंग २५७
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥१॥
गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ध्रु.॥
कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥२॥
शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥३॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥४॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥५॥
न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥६॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥
अर्थ :- कुमारीकेला वयाच्या अठराव्या वर्षपर्यंत गंधर्व,अग्नी,चंद्र भोगतो म्हणून तिच्या वरान तिचा त्याग करावा काय ? ।।1।।
गाय चरताने अनेक लरकारचे घान खाते, घान पाण्याचे ओहोळ गंगेला मिळतात ।।ध्रु।।
कावल्याच्या विष्टेच्या बिज्यापासून पींपळ वृक्षाची निर्मीती होते, पांडवांच्या जन्म कथा वाचल्या तर त्यांच्या कुळात दोष आढळतात ।।2।।
शकुंतला, सूतपुत्र कर्ण, शृंगी, व्यास यांच्याही जन्माची कथा अशीच आहे; पण त्यांना हरिभक्तिने पापांचा नाश करता आला आहे ।।3।।
गणिका अजामेळ, कुब्जा, विदुर आणि पिंगला यांचीही जन्म कथा दोषीत आहे ।।4।।
वाल्याकोळी विश्वमित्रा, वरिष्ट, नारद यांचा पूर्व इतिहास दोषपूर्वकच आहे ।।5।।
वरील सर्व श्रेष्ट मानल्या गेलेल्या व्यक्तींची पातक हरिच्या नामस्मरनानेच नाहीशी झाली आहे ।।6।।
तुकोबा म्हणतात, या प्रमाणे पूर्वी केलेल्या पापांचा पश्चाताप होवून नामस्मरण करणाऱ्या भक्ताच्या दोषाचे जो उच्चारण करतो तो अंती नरकात जातो ।।7।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा