गाथा अभंग २१६
या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥
घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥
नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥
तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥३॥
अर्थ :- आम्ही आणि श्रीकृष्ण एकरूप झालो आहोत. आता एकमेकांची वंचना करणार नाही आणि एकमेकांना सोडणार नाही ।।1।।
देहरूपी मोट श्रीहरिला अर्पण करून मी देहबुध्दिने नाहिसा झालो आहे. आता त्रास कसला? ।।ध्रु।।
ग्रंथिंची गाठ सोडून त्यात सत्य काय आहे, याचा विचार केला ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, मी सर्व उपाधिनपासून अलिप्त होऊन गोपाळांच्या नावे हाका मारिन ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा