शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२६८साळंकृत कन्यादान

गाथा अभंग २६८

साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥१॥

परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥

आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥

सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥

अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥

तुका म्हणे सोस । दुःख आतां पुढें नास ॥५॥

अर्थ :- मिलीचे सलंकृत कन्यादान हे पृथ्वीदानाइतके महत्वाचे पूण्य आहे ।।1।।

या मुर्खाला कन्येसाठी हुँडा दिल्याने होणारे पाप आज कळत नसले तरी पुढे ते पाप भोगताना कळते ।।ध्रु।।

धर्माचारणामुळे पोटहि भरते आणि धर्महि घड़तो ।।2।।

सत्याने वाग्णाऱ्या मनुष्यास देवहि सहाय्य करतो ।।3।।

अन्न, धन, मानसन्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नाशिबाप्रमाने मिळतो  ।।4।।

तुकोबा म्हणतात, कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे, त्याचा शेवतहि दुःखकारकच आहे ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा