रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

२०२पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी

गाथा अभंग २०२

पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥

करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥

आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥२॥

एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥

अर्थ :- गोवळी पाहत होते आणि कृष्णदेव त्यांचे उष्टे खात होते ।।1।।

कान्होबाचे सवंगडी त्याच्या नामाचे चिंतन करीत होते ।।ध्रु।।

आपल्यावर आलेला डाव खेलावा आणि गाईंचे रक्षण करावे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हरी व तुम्ही सर्वजन एका ठिकाणी काला करा ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा