मृदंग पाट्या
गाथा अभंग २२८
पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥
जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥
न रिघतां ठाव आम्हा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपा ॥२॥
तुका म्हणे हातां चडे जीवाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥३॥
अर्थ :- अरे सावळ्या गोपाळांनो, तुमचे प्रयत्न येथे उपयोगी ठरणार नाहीत. तो देव बाहर आल्यावर तुमचा वाटा तुम्हाला देइल ।।1।।
गोपाळांनो, तुम्ही आहात त्या ठिकानिच सावध रहा. जागे रहा. त्याची चाहूल लागली की, माझ्यापासून दूर जा ।।ध्रु।।
आम्हाला येथे प्रवेश नाही म्हणून आम्ही बाहेर राखन करण्याचे काम करतो. बाळगलेत तर फक्त चाचपड़त राहवे लागते ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, तुम्ही जर जीवावर उदार झालात तर तो काल्याचा घास तुम्हाला प्राप्त होइलच. मिटक्या मारत खाताना तो अखेरीस फार गोड लागतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा