सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

२३९काळिया नाथूनि आला वरी

मृदंग पाट्या

गाथा अभंग २३९

काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥

दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥

रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥२॥

आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥३॥

अर्थ :- लोकाहो, तो पहा, भगवान् श्रीकृष्ण कालियाचे मर्दन करून पाण्यातून वर आला आहे. ' तो पहा, पलीकडे दिसतो आहे,' असे म्हणत ते गोपाळ एकमेकांना दाखवु लागले ।।1।।

प्रेमपूर्वक श्रद्धेवाचुन दुसऱ्या कोणत्याही भावनेने कोणालाही देव दिसणार नाह. शद्धा , भाव, प्रेम नसले तर देव जवळ असूनही 'तो नाही' 'तो दिसत नाही'  असा भ्रम मनात निर्माण होतो ।।ध्रु।।

देव अवतार घेतो म्हणजे त्याच्या ब्रमरूपात बदल होतो. पूर्वीच्या रामाआवतारात दिसणारा देव गोरा होता, तर आताच्या कृष्ण आवतारात तो काळा दिसत आहे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, 'गोपाळांनो, भिवु नका, मी आलोच' असे म्हणत आश्वासन देत, देव तुमच्याजवाळ आला, त्या देवाला ख़रेका म्हणू नये ? ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा