गाथा अभंग २५४
इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥
अर्थ :- पृथवितलावर नरदेह धारण लरन्यास स्वर्गातील देवहि उत्सुक आहेत ।।1।।
आम्ही मात्र नारादेहाच्या प्राप्तिने धन्य झालो आणि विठोबाचे दास झालो ।।ध्रु।।
या नारादेहच्या प्राप्तिने आम्हाला भक्ति करता आली आणि भक्तिमार्गातील सच्चितानंद पदवी प्राप्त झाली ।।2।।
तुकोबा म्हणतात, या नारादेहप्राप्तिने जीवनाचे सार्थक करून आम्ही स्वर्गात जागा मिळवू ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा