काला अभंग
गाथा अभंग२२०
धन्य तें गोधन कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥१॥
धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ध्रु.॥
धन्य देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य जालें ॥२॥
धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जालें ॥३॥
धन्य म्हणे तुका जन्मा तींचि आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥४॥
अर्थ :- श्रीकृष्णच्या स्पर्शाने पानव झालेले गोकुळातील गोधन, कांबळि, काठ्या, पावा, वाक्या खरेच धन्य होत ।।1।।
गोकुळातील नर-नारी, गोपाल धन्य होत, सारे गोकुळच धन्य होत ।।ध्रु।।
देवकी, सशोदा या दोघी धन्य आहेत . वासुदेव, नंद हे सर्वात भाग्यवान आहेत ।।2।।
त्या साऱ्या गोपीका, रुक्मिणी, सोळा हाजार एकशे आठ नारी आणि सर्व यादव धन्य आहेत ।।3।।
तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरिच्या रंगात रंगून गेलेली ती सारी माणसे मनुष्यजन्माला येवून धन्य झाली ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा