रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

२००नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ

काला अभंग

गाथा अभंग २००

नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥१॥

नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं । वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ध्रु.॥

तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥२॥

तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥३॥

अर्थ :- हे परमेस्वरा, तुझ्या सहवासात किती आणि कसा वेळ गेला आम्हाला कलाल नाही ।।1।।

कान्होबा, आता आमच्याजवळ थोड़ेसुद्धा भय राहिले नाही. गाईला वळवून तू पोटभर खायला दिलेस ।।ध्रु।।

गाई वळून झाल्यावर 'भय' आहे, असे म्हणणे योग्य नाही।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या संगती भय नाहीच, उलट सुख आहे. आम्ही याचा अनुभव घेतला आहे; त्यामुळे इतरांचे बोलने व्यर्थ आहे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा