शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२८९न लगे चंदना सांगावा परिमळ

गाथा अभंग २८९

न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥

अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥

सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन ॥२॥

तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥

अर्थ :- अरन्यातील चंदनवृक्षाला आपल्यातील चंदनाचा पुरावा इतर वृक्षाणां द्यावा लागत नाही ।।1।।

अतःकरणातील सत्य आपोआप बाहर पड़ते, हा त्याचा स्वभाव आहे ।।ध्रु।।

सूर्य जगाला 'जागा हो' असे म्हणत नाही किव्हा सूर्य किरणे तसे सांगत नाही, उगावने हां त्यांचा मूळ स्वभाव आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, आकाशात मेघांची दाटि झाली की मोर त्याचा आनंद लपवून ठेउ शकत नाही, नाचू लागतात. त्याप्रमाणे सत्य लपत नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा