मृदंग पाट्या
गाथा अभंग २४१
धांव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण ही काई ॥१॥
आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ध्रु.॥
मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ॥२॥
तुका म्हणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥३॥
अर्थ :- कानोबा, कान्होबा, अरे, गाई दूर गेल्या. धाव (असे त्याला म्हणतात) मी कोण आहे? असली हलकी कामें मला का सांगता ? असे श्रीकृष्ण कधीच माणत नव्हता ।।1।।
देवाला आपल्या खऱ्या भक्ताचे बोलने गोड वाटते. तो त्यांची सेवा करतो ।।ध्रु।।
देवा, तू आज अगोदर डाव द्यायला पाहिजे. असे जर सवांगड्यानि म्हंटले तर "मी सामर्थ्यवान आहे." मी का म्हणून आधी डाव देवु?" असा विचार तो कधीच करत नाही ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, श्रीकृष्ण ज्या गोपाळांचा दास होतो, अश्या भक्त गोपाळांना शरण जावे व त्यांचे अनुकरण करावे, असे मला वाटते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा