मृदंग पाट्या
गाथा अभंग २३०
आतां हें चि जेऊं हेंचि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥
हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ध्रु.॥
चवीं चवीं घेऊं घास । ब्रम्हरस आवडी ॥२॥
तुका म्हणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥३॥
अर्थ :- सोबत घेतलेल्या शिदोर्या घेऊन तीच भोजन म्हणून खाऊ ।।1।।
ज्यात प्रेमाचे मोहन घातले आहे, ती हरिनामाचि खिचड़ी हेच साधन आहे ।।ध्रु।।
या काल्याचा प्रत्येक घास आवादिने हळू हळू खाऊ आणि त्यातील ब्रह्मरसाचा आनंद घेऊ ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, जिभेला तो घास जसजसा गोड लागतो, तासताशी जीभ अधिक मागणी करते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा