कला अभंग
गाथा अभंग१९९
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥
बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥
खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥
तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥३॥
अर्थ :- गोपाळ म्हणाले, "सवंगड्यानो, चला. आपण इंद्ररूपि गाईना अंतर्मुख करू आणि एके ठिकाणी बसून आनंदात जेवू ।।1।।
आत्तापर्यंत खुप वनवन झाली. पयपिट करून फार शिन आला आहे ।।ध्रु।।
खांद्यावर प्रपंच्याचा भार आणि मनात सुखाची भूक असताना संसाराचा खेळ खेळण्यात काय सुख आहे? ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, गड़यानो, आता जेवनाची घाई करा. त्यातच आपले कल्याण आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा