मृदंग पाट्या
गाथा अभंग २३८
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥
जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥२॥
तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
अर्थ :- हे गोपाळ स्वतःच्या जीवाला घाबरले आणि त्यामुळे भगवंताला मोकले. वास्तविक तो त्यांच्या जवळच, त्यांच्या अंतकरणात होता; परंतु त्याना ते ठाऊक नव्हते ।।1।।
ते सर्वजन 'आहा' 'हाय-हाय' करू लागले. आपापले हात-पाय डोके पिटून घेऊ लागले ।।ध्रु।।
देव जवळ होता, पण तो आम्हाला काळाला नाही. तो गेल्यावर आता आमच्या दुःखला पारावार नाही ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, देव मोठा लाघवि आहे. प्रत्येकाच्या मनातला खरा-खोटा भाव तो ओळखतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा