गाथा अभंग २११
चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ध्रु.॥
हमामा हुंबरी पांवा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ॥२॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥३॥
पुष्पाचा वरुषाव जाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥४॥
यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनियां मना ॥५॥
अर्थ :- बायानो, चला. चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊ. तेथे पांडुरंगाला पाहू. गोपाळांचा मेळा तिथे भरला आहे. काल्याचा खेळ मांडला आहे ।।1।।
एकमेकांना काल्याचा प्रासादिक घास भरवत आहेत. आपला मोठेपणा विसरून सारे आनंद लहरित नाचत आहेत ।।ध्रु।।
श्रीकृष्णला मध्य भागी बसवून त्यानी त्याच्यासोबत फेर धरला होता. हमामा, हुंबरि असा खेळ चालला होता. श्रीकृष्ण मधे बासरी वाजवित होता ।।2।।
त्या खेळात सर्व स्त्री - पुरुषं लुब्द्ब झाले होते. पशु-पक्षीहि देहभान विसरले होते. त्यांच्या अंत:करनात कसलिच शंका उरली नव्हती ।।3।।
पुष्पवृष्टि चलली होती. आरती करणार्यांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यानी गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, यादवांचा राजा, गोपीजन-गोपी यांचे हरन कारनारा कान्होबा - त्याला पाहुन माझ्या मनालाही मोठे सुख प्राप्त झाले ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा