मृदंग अभंग
गाथा अभंग २४०
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥
योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥
तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥३॥
अर्थ :- सर्व वोपळाना एकत्र करुण हरी त्यांना भेटला. त्यांची कड़कडून गळाभेट घेतली ।।1।।
भाविक असे गोपाळ त्याला फार आवडत होते. आपल्या मानातील गोष्टी तो त्यांना सांगत असे ।।ध्रु।।
योगी, वृषिमुनि भगवंताचे ध्यान करतात; पण तेथे न जाणारा हा देव गोपाळांच्या भाकरी चूरून खात होता ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, तो शाहन्यांपासून दूर राहतो आणि बोबडया गोपाळांचा दास बनून हाका मारून त्यांना जवळ बोलावितो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा