गाथा अभंग २६२
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय म्हणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥
तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥२॥
केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥३॥
ब्रम्हानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आम्ही पाषाणरूप राहणें ॥४॥
अर्थ :- मातीचे शिवलिंग करून त्याची पूज्या केलि ती शंकराला पावते, शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते ।।1।।
त्याचक्षणि तीच महत्त्व संपते, तसे लोक भगवंताची पूजा करण्यासाठी संतांची पूजा करतात, ती संतहृदयातील भगवंतास पावते, आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदविचा मोह आम्हाला नाही ।।ध्रु।।
दगडी विष्णुमूर्तिचि पूजा केलि असता ती विष्णुला पावते, दगड दगडच राहतो ।।2।।
काशाचि जगदंबेचि मूर्ति केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते, कासे हां धातु धातुच राहतो ।।3।।
तुकोबा म्हणतात, आशा प्रकारचे संतांचा भक्तिभाव हा पुजेप्रमाने एक माध्यम आहे, त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ति करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा