गाथा अभंग २१५
या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥
घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥
नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥
तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥३॥
अर्थ :- सवंगड्यानो, या. झोपला काय रे ? आपण इंद्ररूपी गाई एकत्र करूं या. गई उधळल्या ऐसा बोभाटा केला आणि जो तर मायारूपी आईला एकु गेला व ती आपल्याला मारेल ।।1।।
गाईंना बोलाविन्यासाठी 'कु-कु' अश्या हाका मारा, ज्याची गाय असेल ती त्या हाकेने परत फिरेल. तू सावध केले तर एवढे काम पुरेसे होईल ।।ध्रु।।
योग्य काय, अयोग्य काय हे पाहुन खेळावे हे तुम्हाला काळात नाही. वाइटाशि खेलता आणि स्वतः वाइट होऊन बासता ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, संगीतलेले निट ध्यानात ठेवा; नाहीतर भिक मागायची पाळी येईल. मनेरी (मनरूपी) गाय वाळायला लागल्यास ति धावत सुटते, हे सर्वानी लक्षात ठेवावे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा