गाथा अभंग २४५
संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥
पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥
तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥
अर्थ :- संतसज्जनांचे बाह्यात्कारि वर्तन पाहुन एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्याची पुण्याई नष्ट होते ।।1।।
जसे एखादा मनुष्य फुलाचा सुगंध हुंगन्यासाठी फुलाचा चोळामोळा करतो आणि कळयांचा घड़ पाहण्यासाठी केळीचे झाड़ मोडतो ।।ध्रु।।
तुकोबा म्हणतात, गंगा आणि अग्नी याना जो विटाळ मानतो, तो चंडाळ संजावा ।।2।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा