गाथा अभंग२०६
त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तो चि देईल तें खावें ॥१॥
न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हा चि निर्धार त्याला ॥ध्रु.॥
कान्होबा तू जेवीं घासोघासीं म्हणती । आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥
तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥३॥
अर्थ :- गोपाळ तृप्त होईपर्यंत श्रीकृष्णच्या संगतीत राहिले; आपले सर्वस्व त्याला दिले व तो जे देईल, तेच ते सारे खात होते ।।1।।
हरिन त्यांचे ऋण ठेवले नाही. त्यांच्या प्रेमासाथो तो भुकेला होता. खुप दिवस त्यांची सांगत घडावि, ऐसा श्रीकृष्णचा निर्धार होता ।।ध्रु।।
कृष्णा, तू जेव ना. असे प्रत्येक घास घेत असतांना गोपाळ त्याला आळवित होते. बोबडे बोल बोलाणाऱ्या गोपाळांवर त्याचे खुप प्रेम होते. ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, आता आपण आपल्या घरी जाउया आणि या कृष्णने आम्हाला वाचविले, असे आपण सर्वाना सांगुया ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा