गाथा अभंग २६९
दिवट्या वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥
नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥
गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥
करूं द्यावें न्हावें वरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥३॥
वर्हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥४॥
तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥
अर्थ :- दिवट्यांचि आरास करुण, वाद्ये लावून, सुग्रास भोजन देवुन सुंदर मुलगी (वस्त्रालंकाराने नटलेली) वराला अर्पण करतात ।।1।।
आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात ।।ध्रु।।
व्याही, विहिनीचा मानसन्मान करतात, काही कमी पडू देत नाहीत ।।2।।
वराकडिल मंडळी काशीही वागली तरी वाइट वाटून घेवू नये ।।3।।
विहीन रागाऊन वर्हाडापाठीमागे धावते ।।4।।
तुकाराम माहाराज म्हणतात, लोकांचे आशे अचण म्हणजे नरकात जान्याची व्यवस्ता आहे ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा