सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

२३१अवघें चि गोड जालें

मृदंग पाट्या

गाथा अभंग २३१

अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥

साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥

थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥

तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥

अर्थ :- माझे पूर्व पूण्य फळाला आले आणि आज सारेकाहि गोड झाले आहेमागिल सुखाची उणीव आता भरून निघाली आहे ।।1।।

विट्ठलाणे मदत केली. अभ्यंतरि राहून त्याने सोबत केलि ।।ध्रु।।

नदी पार करताना बुड़नारा कुणी त्यातून वाचून पैलतिरावर सुखरूप पोहचला व नंतर मागे बुडून आलेली जागा त्याने पाहिली., तर1 बुडण्याची गोष्ट उरलीच नाही ।।2।।

तुकाराम माहाराज म्हणतात, जाग आल्यावर स्वप्नातील भीति उरली नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा