मृदंग पाटया
गाथा अभंग २३५
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥१॥
तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥
आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥३॥
अर्थ :- क्षणभर जरी आम्ही हरीला बाजूला केले तरी तो काकुळतीला येतो ।।1।।
तो म्हणतो, तुमचा माला लळा लागलेला आहे. तुम्ही माझे सुरवातिपासूनचे सवंगडि आहेत, नविन नाहीत ।।ध्रु।।
इतर अनेक थोर, श्रेष्ट लोक मला बोलवितात; परंतु ते माला अवडत नाहीत ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, त्याला भाविक भक्तांची फार आवड आहे. त्याना तो जीवे भावे मीठी मारतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा