गाथा अभंग २७३
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥
देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥
लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥
तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥
अर्थ :- रडून, भृकुन जर मान मागितला आणि समाजाने तो अनिच्छेने दिला, तर त्याला महत्त्व नाही ।।1।।
दीवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधिनि वृत्तिने पाहतो ।।ध्रु।।
शेतातील धान्याचे दान आणि भिक मागून आणलेल्या धन्याचे दान यामध्ये फरक आहे ।।2।।
तुकोबा म्हणतात, जीवनात धीर, संयम धरल्यास हिर्याप्रमाने मोल प्राप्त होते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा