सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

२४४उपदेश तो भलत्या हातीं

गाथा अभंग २४४

उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥१॥

नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥

स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥

तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥

अर्थ :- उपदेश करणारी व्यक्ति ही कोण आहे दे न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवा ।।1।।

जसे नारालाच्या कारवंटीच्या आंतिल मधुर चविचे पाणी व खोबरे खाऊन करवंटि टाकून देतो, ।।ध्रु।।

त्याप्रमानेच पत्नी, पुत्र किंवा नोकर  यांनी भक्ति मार्ग दाखविला तरी तो आचरणात आनावा ।।2।।

तुकोबा म्हणतात, जसे मौल्यवान रत्न चिंधिमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तसे उपदेश करणारी व्यक्ति सामान्य जरी असली तरी श्रेष्ट मानावि ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा