गाथा अभंग २९२
मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
अर्थ :- मायबाप सर्पिंन आणि बोक्याप्रमाने असतील तर मुलाला त्यांच्या सहवासात सुख वाटत नाही ।।1।।
चंदन लाकडाचा चंदनाचा सुळ असला तरी जीव घेणार आणि सोन्याची बेड़ी असली तरी पायांना ती दुःखदायक भासनार ।।2।।
तुकोबा म्हणतात, एखादा मनुष्य ज्ञानी असेल आणि त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, अहंकार असेल तर तो नरकातच जाणार ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा