गाथा अभंग२०८
काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥
लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥
उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडे । जोडुनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥२॥
तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥३॥
अर्थ :- काला खावूं नाधिच्या पाण्यात गोपाल हात धुतिल तेव्हा तरी त्या काल्याचे उष्टे आपल्याला मिळेल. या आशेने स्वर्गातील देव पाण्यात मासे बनून राहिले . हे त्यांचे कपट हरिन ओळखले, उष्टे हात टिरीला (ढुंगनाला) पुसले आणि हसला ।।1।।
जे लाजं दूर बसले होते, त्याना काल्यातील वाता मिळाला नाही. हरी सर्वांच्या मनातील जाणतो. जे त्याच्या चरणी दिन होतात, त्याना आपल्यापासून दूर होउ देत नाही . ।।ध्रु।।
त्याच्यापुढे उपाय हे अपाय होतात. खोते कूड़े निवडून तो बाजूला काढतो. जे त्याच्यापुढे हॉट जोडून उभे राहतात त्यांची तो अपेक्षा करीत नाही ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या वाट्याला जे येईल, ते त्याने सावकाश घ्यावे आणि कृष्णच्या प्रेमरसात आनंदाने राहावे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा