ब्रम्हाच्यार्याचा निषेध अभंग
गाथा अभंग २५१
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥
भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥
अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥
तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥
अर्थ :- जोवर मकनातून विषयकसक्ति दूर झाली नाही, तो पर्यंत स्त्री-पुत्र यांचा प्रपंच्याचा त्याग केला तरी काही अर्थ नाही ।।1।।
दुराचारी माणसाने केलेले भजन पापुक्त असल्यामुळे वाइटच होय . त्यामुळे तो नाराकवासच भोगनार, ते चुकनार नाही ।।ध्रु।।
अंत:करणात जर संतांची निंदा करण्याची कितीही खटाटोप केली तरी ती व्यर्थ आहे ।।2।।
तुकोबा म्हणतात, अश्या माणसांची प्रगति होणार नाही. त्याचे पाय नाराकात ओढले जातील ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा