शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२५१कुटुंबाचा केला त्याग

ब्रम्हाच्यार्याचा निषेध अभंग

गाथा अभंग २५१

कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥

भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥

अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥

तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥

अर्थ :- जोवर मकनातून विषयकसक्ति दूर झाली नाही, तो पर्यंत  स्त्री-पुत्र यांचा प्रपंच्याचा त्याग केला तरी  काही अर्थ नाही ।।1।।

दुराचारी माणसाने केलेले भजन  पापुक्त असल्यामुळे  वाइटच होय . त्यामुळे तो नाराकवासच भोगनार, ते चुकनार नाही ।।ध्रु।।

अंत:करणात जर संतांची निंदा करण्याची कितीही खटाटोप केली तरी ती व्यर्थ आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, अश्या माणसांची प्रगति होणार नाही. त्याचे पाय नाराकात ओढले जातील ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा