गाथा अभंग २५५
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥
जाणोनियां लाभ घेई हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥२॥
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥
नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥४॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरिकथेविण ॥५॥
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥६॥
तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आवघें मूळ तेथें ॥७॥
अर्थ :- तू जगात पंडित अथवा प्रवचन कार झाला असलास तरी कृष्णकथा भक्तिभावाने ऐक ।।1।।
त्यातील गोड दूध, तूप आणि साखर यांच्या मिश्रना प्रमाणे अधिक मधुर आहे ।।ध्रु।।
तुझ्या विद्वत्तेत कृष्णकथा मिसळून ती अधिक मधुर बनेल ।।2।।
तुला जर आपले हित साधायचे असेल तर जानिवेच्या अहंकाराचे मुळापासून उच्चाटन करुण टाक ।।3।।
देहाच्या शृंगारासाठी सुगंधियुक्त चंदनऊटी उपयुक्त आहे ।।4।।
पण पोट भरले नसेल तर देहशृगाराचा काही उपयोग नाही, तसे हरिकथेवाचुन विद्वत्ता काहीच कामाची नाही ।।5।।
ज्या प्रमाणे वेद, श्रुती, पुराने यंमध्ये विठ्ठलरूपची संपत्ति समावली आहे. त्यामुळे त्यांना महत्त्व आहे ।।6।।
तुकोबा म्हणतात, तसे हरिकथेवाचून पांडित्य म्हणजे फक्त डागडांचे पेव आहे, ते उपसने म्हणजे व्यर्थ श्रमाची खळबळ आहे ।।7।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा