गाथा अभंग २४३
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥
आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥
त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोटा दिसतसे ॥२॥
तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जाती ॥३॥
अर्थ :- देवाच्या भक्तीचे ढोंग करणारया मानसांण बद्दल तुकोबाला आचार्य वाटते ।।1।।
अशा ढोंगी भक्तांची अवस्ता तर प्रापंचिक मनुष्याला परमार्थासाठी सवडच मिळत नाही ।।ध्रु।।
परमार्थासाठी संसाराचा त्याग करुण, त्यांच्या मनात अहंकार निर्माण होतो ।।2।।
तुकोबा म्हणतात, की जगात असे काही लोक आहेत, की ते प्रपंच्यही नेटका करत नाहीत आणि प्रमार्थही करत नाहीत, ते फक्त आळसात वेळ वाया घालवतात ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा