काला अभंग
गाथा अभंग २२२
देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥
जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥
मोठें भावार्थाचें बळ । देव जाला त्याचें बाळ ॥२॥
तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोवाटीं ॥३॥
अर्थ :- यशोधेमातेने कृष्णला माती खातानि पाहिले व (म्हणून) त्याला दाव्याने बांधून टाकले ।।1।।
श्रीकृष्ण हातात जाळि , कांबळी, काठी आणि बासरी घेवून गांईंच्या माघे जावून, त्याना राखित होता ।।ध्रु।।
भावभक्तीचे बळ खुपच महान आहे, म्हणून प्रतक्ष देव यशोधे मातेचा बाळ झाले ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिसाठी देव त्याच्या माघे धावत येतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा