मृदंग पाट्या
गाथा अभंग २३७
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥
आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥
चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥
तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥३॥
अर्थ :- सर्व गोपाळानि एकत्र जमुन आरड़ा-ओरडा केला. ते म्हणू लागले, आत्ता पर्यंत हा इथेच होता आणि एकदम नाहिसा कसाकाय झाला ।।1।।
ज्याची त्याच्यावर जाशी श्रधा होती, जसे प्रेम होते, तसे ते रडत होते ।।ध्रु।।
खेळताना त्याची आणि आमुची चुकामुक झाली आणि तो हातचा गेला ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, धावत सर्वजन काठावर गेले; परंतु कोणीच उडी घेइना ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा