शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२५६आणिकांच्या कापिती माना

गाथा अभंग २५६

आणिकांच्या कापिती माना । निष्ठ‍पणा पार नाहीं ॥१॥

करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥

सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥

तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥

अर्थ:- जगात काही लोक आपल्या फयदयासाठी लोकांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरपनाला सीमा नसते ।।1।।

त्यांच्या या पापकृत्याने ते यमपुरीचि उसनवारि करतात ।।ध्रु।।

दगडाच्या देवाला शेंदुर फासुन त्याला नवास-सायास करतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, दुसर्याला त्रास देणारी पोरे रात्री अंग दुखते म्हणून राड़तात, त्याच प्रमाणे स्वताच्या फायद्यासाठी इतरांना दुःखि करणारे लोक शेवटी दुःखच भोगतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा