गाथा अभंग २५६
आणिकांच्या कापिती माना । निष्ठपणा पार नाहीं ॥१॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥
तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥
अर्थ:- जगात काही लोक आपल्या फयदयासाठी लोकांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरपनाला सीमा नसते ।।1।।
त्यांच्या या पापकृत्याने ते यमपुरीचि उसनवारि करतात ।।ध्रु।।
दगडाच्या देवाला शेंदुर फासुन त्याला नवास-सायास करतात ।।2।।
तुकोबा म्हणतात, दुसर्याला त्रास देणारी पोरे रात्री अंग दुखते म्हणून राड़तात, त्याच प्रमाणे स्वताच्या फायद्यासाठी इतरांना दुःखि करणारे लोक शेवटी दुःखच भोगतात ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा