मृदंग पाट्या
गाथा अभंग २३२
तुजसवें येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिला गिरी । चांग तईं वांचलों ॥१॥
मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तो चि आवरा ॥ध्रु.॥
चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आम्ही नाहीं भय धाक या अनंता ॥२॥
खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥३॥
तुका म्हणे उरी नाहीं तुजसवें । शाहाणे या भावें दुरी छंद भोळियां सवें ॥४॥
अर्थ :- हे हरी, आम्हाला लाज नाही. आम्ही तुझ्याबरोबर येतो. देवा, तुम्ही गोवर्धन परवत उचलला म्हणून तर आम्ही जिवंत राहिलो ।।1।।
आता खेळ थांबला. गाई पुढे गेल्या आहे. घरी परतन्याची वेळ होऊन गेली आहे. वास्नारूपा गाई या वोढाल आहे. जोपर्यंत त्या पांगल्या गेल्या नाहीत, तोवरच त्याना आवरले पाहिजे ।।ध्रु।।
आम्ही यमुना नाधित बूड़त असतांना सुदैवाने वाचलो. आम्ही नोलाजरे आहोत. या आनंताला मात्र काहीच धाक, भीति नाहीच ।।2।।
हा देव आग, माती खातो याची सांगत आता पुरे झाली. हा आपल्या सभोताळच्या सर्वांना त्रास देईल असे वाटते ।।3।।
तुकाराम माहाराज म्हणतात, देवा, तुझा सहवास आम्हाला परवडत नाही तू शहान्यांना दूर ठेवतोस आणि भोळ्या भाबड़या भाविकांना तुझा छंद लावतोस ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा