विटूदांडू - अभंग १
गाथा अभंग २०१
माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥
एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥
पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥
एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥
तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥
अर्थ :- गड़यानो, आता वितिदानदुचा खेळ ज़रा बाजूला ठेवून आपण दूसरा एखादा खेळ खेळु ।।1।।
पुष्कळ डाव आंगावर आले. या प्रपंचरूपी खेळात आपले पाय कुठेच् स्तिर राहिले नाही ।।ध्रु।।
(वधूपितारूपि) एक गड़ी (कन्यारूपी) वीटी कोलून तिला ( लग्नरूपि) टोला मारतो. दुसरा (जावाईरुपि) गड़ी ती झेलतो, त्याने टी वीटी झेलली आहे, तोच या डावात गुंततो ।।2।।
डावात आलेल्या लग्न झालेल्या त्या स्त्रीसह सारे एकमेकांना हका मारतात. कढ़ी वृदयाला सलनारे बोल बोलतात. एखादा गाड़ी पळून जायला लागल्यावर त्याला पकडून ठेवतात ।।3।।
एकडाकि या प्रपंचिक गाड्यांच्या रांगेत नाव लागले की जन्म-मृत्यु च्या फेऱ्या आणि संपत्तिचि हाव कधीच चुकत नाही ।।4।।
या रांगेत मुलगा, नातू, पंतू हे पुढे असतात व बाप, आजोबा, पंजोबा हे गाड़ी मागे असतात. एकमेकांच्या पालनपोषणाचा दोघानाहि प्रयत्न करत राहावा लागतो ।।5।।
विटीदांडूच्या या खेलाविषयी काहीनच्या मनात फार हाव्यास असतो. त्यामुळे धनलोभाकडे धाव घेतात. त्यातून थोडाफार फायदा झाला की आनदाने टाळ्या पिटतात ।।6।।
तुकाराम महाराज म्हणतात, आता हां खेल सोडा आणि दुसरा खेल मांडा ।।7।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा