डाकेचे अभंग
गाथा अभंग ४२०
देवी देव जाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥
हरिनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥
शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥२॥
गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥३॥
अर्थ :- सर्वच देवी, देव आले, त्यामुळे भोग संपूण गेले. आता दूसरे काही शिल्लक राहिले नाही ।।1।।
हरिनाम, देवनाम गात तुम्ही सतत जागे राहा. आपल्या सरमानुसार धन मागा; त्याबद्दलचि कटकट ठेवू नका ।।ध्रु।।
अखेरच्या वेळी चांगली टाळी वाजवावी. एक संपले की अखेरीस जिव-ब्रह्म यांच्या एक्यानुभवाचा चांगला मेळ घालावा ।।2।।
तुकोबाराय म्हणतात, आज मानकार्याणि आपला मान नेला. आज सर्वांच्या अडचणी नष्ट झाल्या. आता हां चौक देव्हारा गुंढळून ठेवावा ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा